मा. कै. शांताराम मुलू खापरे

संस्थापक

रत्नागिरी तालुक्यातील राई गावी जन्माला आलेले आणि समस्त रत्नागिरी तालुक्यातील तळागाळातील कुणबी समाजातील काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या आर्थिक अडचणींची उणीव भरून काढण्यासाठी या संस्थेचे संस्थापक कै. शांताराम खापरे यांनी १९८३ साली रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढी ची स्थापना केली होती. नानावटी रुग्णालयात नोकरी करत असताना समाजसेवेच्या आस्थेमुळे गावागावातील तमाम समाजबांधवांना एकत्र करून या पतपेढीच्या आर्थिक व्यवहार वाढवण्यास साहेबांचा मोठा सहभाग होता. खापरे साहेब आणि किंजळे यांच्या तरुण नेतृत्वाखाली या संस्थेची स्थापना मालाड कुरार व्हिलेज येथे प्रथम शाखा सुरु करण्यात आली. अश्या या थोर समाजसुधारकाला भावपूर्ण आदरांजली